नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला कार्की कॅबिनेटचा विस्चार जाला आणि या कॅबिनेटमध्ये तीन नवनियुक्त मंत्र्‍यांना सामील करण्यात आले.


या कॅबिनेट विस्तारानंतर सुशीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबरला नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शोक Gen-Z आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या सर्व युवकांच्या वीरता आणि बलिदानाचा सन्मानार्थ समर्पित आहे.


नेपाळमध्ये Gen-Z म्हणजेच युवकांच्या आंदोलनाने चार दिवसांच्या आत सरकारला पाडले आणि आपल्या पसंतीचे सरकार निवडले. राजधानी काठमांडू, पोखरा, बुटवलसह देशभरात अनेक ठिकाणी ओली सरकारविरोधात आंदोलने झाली.


या आंदोलनादरम्यान तरुणांनी सामाजिक आणि राजकीय न्यायाची मागणी करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या आंदोलनात ७२ जणांचा मृत्यू झाला. यात ५९ आंदोलनकर्ते, १० जेलचे कैदी आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. जखमींची संख्या दोन हजारांच्या वर आहे.



प्राण गमावणाऱ्या Gen-Zला मिळणार शहीदांचा दर्जा


सुशीला कार्कीच्या कॅबिनेट सरकारने आंदोलनादरम्यान जीव गमावणाऱ्या तरुणांना शहीद दर्जा देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय त्यांच्या बलिदानाचे सन्मान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. १७ सप्टेंबरला देशभरातील झेंडा हा तरुणांच्या सन्मानार्थ अर्ध्यावर उतरलेला राहील.

Comments
Add Comment

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना