नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला कार्की कॅबिनेटचा विस्चार जाला आणि या कॅबिनेटमध्ये तीन नवनियुक्त मंत्र्‍यांना सामील करण्यात आले.


या कॅबिनेट विस्तारानंतर सुशीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबरला नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शोक Gen-Z आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या सर्व युवकांच्या वीरता आणि बलिदानाचा सन्मानार्थ समर्पित आहे.


नेपाळमध्ये Gen-Z म्हणजेच युवकांच्या आंदोलनाने चार दिवसांच्या आत सरकारला पाडले आणि आपल्या पसंतीचे सरकार निवडले. राजधानी काठमांडू, पोखरा, बुटवलसह देशभरात अनेक ठिकाणी ओली सरकारविरोधात आंदोलने झाली.


या आंदोलनादरम्यान तरुणांनी सामाजिक आणि राजकीय न्यायाची मागणी करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या आंदोलनात ७२ जणांचा मृत्यू झाला. यात ५९ आंदोलनकर्ते, १० जेलचे कैदी आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. जखमींची संख्या दोन हजारांच्या वर आहे.



प्राण गमावणाऱ्या Gen-Zला मिळणार शहीदांचा दर्जा


सुशीला कार्कीच्या कॅबिनेट सरकारने आंदोलनादरम्यान जीव गमावणाऱ्या तरुणांना शहीद दर्जा देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय त्यांच्या बलिदानाचे सन्मान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. १७ सप्टेंबरला देशभरातील झेंडा हा तरुणांच्या सन्मानार्थ अर्ध्यावर उतरलेला राहील.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल