गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा


रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे. गावची जमीन गावातच ठेवायची, गावाबाहेरच्या कोणालाही गावातील जमीन विकायची नाही, अशा स्वरुपाचा ठराव मोरवणेच्या ग्रामसभेने केला आहे. हा ठराव कोकणवासियांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. पैशांसाठी अनेकदा परगावात किंवा शहरात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या व्यक्तीला किंवा खासगी आस्थापनाला जमीन विकली जाते. या जमिनीला नंतर विकसित केले जाते. या प्रक्रियेत काही वेळा नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होतात. स्थानिक निसर्गसंपदा नष्ट होते. हे संकट टाळण्यासाठी गावची जमीन गावातच ठेवण्याचा ठराव करण्यात आला आहे.


कोणत्याही कारणामुळे जमिनी परगावात राहणाऱ्यांना विकल्या तर स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उरणार नाही. जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून काही दलाल गब्बर होतील. पण स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांना जमीन नसल्यामुळे पैशांसाठी परगावात किंवा शहरात जाऊन काम करावे लागेल. हा धोका टाळणे आवश्यक आहे, असे मत मोरवणेच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडले. यानंतर मोरवणेच्या ग्रामसभेने परगावातील नागरिकाला किंवा खासगी आस्थापनाला जमीन विकायची नाही, असा निर्णय एकमताने घेतला.


जमिनीच्या अनियंत्रित व्यवहारांना आळा घालणे या उद्देशाने मोरवणेच्या ग्रामसभेने ठराव केला आहे. हा ठराव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. पण संपूर्ण गावावर या ठरावाने अप्रत्यक्षरित्या एक सामाजिक बंधन घातले आहे. ग्रामस्थांनी ठरावाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तःवर घेतली आहे. कोणीही बाहेरच्या व्यक्तीस जमीन विकण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसभा त्याविरोधात उभी राहील, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.


बाहेरचे लोक पैशाच्या जोरावर जमीन घेतात आणि गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हा ठराव अत्यावश्यक असल्याचे मत ठरावावेळी मांडण्यात आले. जमिनी गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवायला हव्या, अशीही भूमिका मांडण्यात आली. स्थानिकांना भविष्यात त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा हवी असेल तर आतापासून गावाबाहेर जमीन विकायची नाही हे सामाजिक बंधन पाळावे लागेल, असेही मत ग्रामसभेत मांडले गेले. गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवत भविष्यातील पिढ्यांना शेती आणि घरासाठीच्या जमिनींची कमतरता भासू नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एखाद्याची पैशांची निकड असेल तर गावातल्याच एखाद्याने जमीन खरेदी करुन आर्थिक प्रश्न सोडवण्यासास मदत करावी, असाही विचार ग्रामसभेत मांडला गेला. या विचाराचे ग्रामसभेने स्वागत केले.


Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Full Schedule : ४ गट, २० संघ! २०२६ च्या ICC T-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण ग्रुप रचना आणि सामन्यांची ठिकाणे; तुमचा आवडता संघ कुठे खेळणार?

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे

रामजन्मभूमीमध्ये मोदींचे आगमन, ध्वजारोहणाची लगबग सुरू

अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज

Ram Mandir Flag Hoisting Ceremony : १९१ फूट उंची आणि २२ फूट लांबीचा विक्रमी ध्वज, आज अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या

राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Stock Market Opening Bell : मेटल, रिअल्टी शेअर उसळले सेन्सेक्स व निफ्टीत 'या' कारणामुळे वाढ दिवसभरात 'हे' अपेक्षित!

मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ अपेक्षित आहे. जागतिक सत्रात वाढ होत असताना

अयोध्येत आज आनंदाचे वातावरण! राम मंदिरावर फडकणार भगवा

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर