"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांवर तिखट टिका केली आहे. राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अनंत परांजपे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


टी २० आशिया कप २०२५ स्पर्धेत आज पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना दुसरीकडे आज उबाठा गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं आहे. तर सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टिका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना आनंद परांजपे यांनी राऊतांना बिनडोक राजकारणी असे संबोधले. ते म्हणाले, "संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही".


शिवसेना उबाठाच्या रॅलीतील विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे असे खडेबोल देखील त्यांनी सुनावले. तसेच आज दुबईत होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) सदस्य असलेले उबाठा  आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत, ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट

कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन