मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय पासपोर्टच्या  आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी, कृष्णा मार्पन तमांग (वय २९) तर  दुसरा ६७ वर्षीय निरंजन नाथ सुबल हा बांगलादेशचा रहिवासी आहे.


या दोघांनी कोलकातामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतीय पासपोर्ट मिळवले होते. त्यांनी या पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजन नाथ शुक्रवारी मस्कत (ओमानची राजधानी) येथून मुंबईत परतला. त्याची कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पासपोर्ट फसवणूक केल्याची कबुली दिली.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्याच वेळी कृष्णा मार्पन तमांग विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत होता आणि चेक-इन दरम्यान त्याला पकडण्यात आले. दोघांनाही सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक आणि बनावटीशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, दोघांविरुद्ध पासपोर्ट कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट पासपोर्टवर दोन्ही आरोपींचा अनेक देशांमध्ये प्रवास


बनावट पासपोर्टच्या मदतीने या दोन्ही आरोपींनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचेही तपासात उघड झाले आहे. कोलकातामध्ये त्यांच्यासाठी पासपोर्ट कोणी तयार केले आणि या टोळीत आणखी लोक सामील आहेत का, याचा पोलिस आता कृष्णा मार्पन तमांग आहेत. सहार पोलिसांचे पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या अटकेमुळे विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काही खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा सोमवारी रात्री जुहू परिसरात भीषण

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक