मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय पासपोर्टच्या  आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी, कृष्णा मार्पन तमांग (वय २९) तर  दुसरा ६७ वर्षीय निरंजन नाथ सुबल हा बांगलादेशचा रहिवासी आहे.


या दोघांनी कोलकातामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतीय पासपोर्ट मिळवले होते. त्यांनी या पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजन नाथ शुक्रवारी मस्कत (ओमानची राजधानी) येथून मुंबईत परतला. त्याची कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पासपोर्ट फसवणूक केल्याची कबुली दिली.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्याच वेळी कृष्णा मार्पन तमांग विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत होता आणि चेक-इन दरम्यान त्याला पकडण्यात आले. दोघांनाही सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक आणि बनावटीशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, दोघांविरुद्ध पासपोर्ट कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट पासपोर्टवर दोन्ही आरोपींचा अनेक देशांमध्ये प्रवास


बनावट पासपोर्टच्या मदतीने या दोन्ही आरोपींनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचेही तपासात उघड झाले आहे. कोलकातामध्ये त्यांच्यासाठी पासपोर्ट कोणी तयार केले आणि या टोळीत आणखी लोक सामील आहेत का, याचा पोलिस आता कृष्णा मार्पन तमांग आहेत. सहार पोलिसांचे पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या अटकेमुळे विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काही खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक