मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय पासपोर्टच्या  आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी, कृष्णा मार्पन तमांग (वय २९) तर  दुसरा ६७ वर्षीय निरंजन नाथ सुबल हा बांगलादेशचा रहिवासी आहे.


या दोघांनी कोलकातामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतीय पासपोर्ट मिळवले होते. त्यांनी या पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजन नाथ शुक्रवारी मस्कत (ओमानची राजधानी) येथून मुंबईत परतला. त्याची कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पासपोर्ट फसवणूक केल्याची कबुली दिली.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्याच वेळी कृष्णा मार्पन तमांग विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत होता आणि चेक-इन दरम्यान त्याला पकडण्यात आले. दोघांनाही सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक आणि बनावटीशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, दोघांविरुद्ध पासपोर्ट कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट पासपोर्टवर दोन्ही आरोपींचा अनेक देशांमध्ये प्रवास


बनावट पासपोर्टच्या मदतीने या दोन्ही आरोपींनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचेही तपासात उघड झाले आहे. कोलकातामध्ये त्यांच्यासाठी पासपोर्ट कोणी तयार केले आणि या टोळीत आणखी लोक सामील आहेत का, याचा पोलिस आता कृष्णा मार्पन तमांग आहेत. सहार पोलिसांचे पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या अटकेमुळे विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काही खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन