मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय पासपोर्टच्या  आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी, कृष्णा मार्पन तमांग (वय २९) तर  दुसरा ६७ वर्षीय निरंजन नाथ सुबल हा बांगलादेशचा रहिवासी आहे.


या दोघांनी कोलकातामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतीय पासपोर्ट मिळवले होते. त्यांनी या पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजन नाथ शुक्रवारी मस्कत (ओमानची राजधानी) येथून मुंबईत परतला. त्याची कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पासपोर्ट फसवणूक केल्याची कबुली दिली.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्याच वेळी कृष्णा मार्पन तमांग विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत होता आणि चेक-इन दरम्यान त्याला पकडण्यात आले. दोघांनाही सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक आणि बनावटीशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, दोघांविरुद्ध पासपोर्ट कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट पासपोर्टवर दोन्ही आरोपींचा अनेक देशांमध्ये प्रवास


बनावट पासपोर्टच्या मदतीने या दोन्ही आरोपींनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचेही तपासात उघड झाले आहे. कोलकातामध्ये त्यांच्यासाठी पासपोर्ट कोणी तयार केले आणि या टोळीत आणखी लोक सामील आहेत का, याचा पोलिस आता कृष्णा मार्पन तमांग आहेत. सहार पोलिसांचे पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या अटकेमुळे विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काही खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ