IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज


मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुन्या व तीव्र क्रीडा प्रतिस्पर्धत गणला जातो. जेवहा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा तो केवळ एक सामना नसून तो इतिहास, भावना आणि अपक्षा यांचा संघर्ष असतो. रविवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धेतील लढत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणार आहे.


आकडेवारीपासून ते सध्याच्या कामगिरीपर्यंत भारताचे पाकिस्तानवर पारडे जड असल्याचे दिसून येते; परंतु हा हायवोल्टेज सामना असून इथे प्रत्येक षटक आणि प्रत्येक धाव एक नवा इतिहास रचते. आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या १६ विश्वचषक सामन्यांपैकी १५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यात एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आठ सामने झाले, ते सर्वच्या सर्व भारताने जिंकले आहेत.


टी-२० विश्ववषकात देखील आठ सामने खेळवण्यात आल असून त्यातील ७ सामने भारताने तर १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे. १९८४ पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ आशिषा चषकांमध्ये भारत आणि पाकिस्तान मांच्यात १८ सामने झाले आहेत. यापैकी १० सामन्यांमध्ये भारताने, तर ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे.


शुक्रवारी पाकिस्तानने ओमानविरुद्ध या स्पर्धेतील पहिला साना खेळताना ९३ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सलमान आमा बोलताना म्हणाला, फलंदानीत आम्हाला अद्यापही सुधारणा कराव्या लागतील, गोलंदाजी शानदार होती. मी गोलंदाजीसाठी खुश आहे, आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत आणि तिघेही वेगवेगळे आहेत.


एकदिवसीय १८ सामने


भारत विजयी: ५० सामने


पाकिसतान विजयी ६ सामने


निकाल लागला नाही: २ सामने



टी-२० : ८ सामने


भारनिजयी: ॥ सामने


पाकिस्तान १ सामना



आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता?


भारत - ८ विजेतेपदे (१९८४,


१९८८, १९१०-११, १९९५ २०१०, २०१६, २०१८, २०२३)


श्रीलंका - ६ विजेतेपदे


पाकिस्तान- २ विजेतेपदे



गेल्या पाच वर्षांची स्थिती


सप्टेंबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंग, दोन्ही संघानी टी-२० स्वरूपात ५ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यापैकी भारत ३-२ अशा फरकाने पुढे आहे. ही अलीकडील कामगिरी भारताचा आत्मविश्वास वाढवते.



Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या