Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घटना मिझोरम राज्यात पार पडली. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना थेट कार्यक्रमस्थळी जाता आले नाही. परिणामी, मिझोरमची राजधानी आयझॉल येथील विमानतळावरूनच त्यांनी तब्बल ९,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आयझॉल विमानतळावरूनच तीन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तसेच बैराबी-सायरंग रेल्वे मार्गाचे औपचारिक उद्घाटन केले. या मार्गामुळे मिझोरम पहिल्यांदाच थेट देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. विशेष म्हणजे, या रेल्वे मार्गावरून आता मिझोरममधून थेट दिल्लीसाठी रेल्वेसेवा सुरू होणार आहे. या नवीन रेल्वे लाईनमुळे मिझोरम आणि ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. स्थानिक व्यापार, पर्यटन आणि विकासाला यामुळे गती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिझोरममधील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, “मी या सुंदर निळ्या पर्वतांच्या भूमीवर असलेल्या पथियन देवतेला नमन करतो. दुर्दैवाने खराब हवामानामुळे मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. मात्र आयझॉलमधूनच तुमच्याशी जोडल्यामुळे मला तुमच्या प्रेमाची आणि आत्मीयतेची जाणीव होत आहे.”



रेल्वे लाईन नव्हे, विकासाची जीवनरेषा : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममध्ये सुरु झालेल्या बैरबी-सैरंग रेल्वे लाईनला विकासाची जीवनरेषा असे संबोधले आहे. त्यांनी सांगितले की, “आजचा दिवस मिझोरमच्या जनतेसाठी ऐतिहासिक आहे. आजपासून आयझॉल अधिकृतपणे भारताच्या रेल्वे नकाशावर आले आहे.” काही वर्षांपूर्वी मोदींनी या रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली होती आणि अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या कामात अभियंते आणि कामगारांचे विशेष योगदान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या रेल्वे लाईनच्या माध्यमातून सैरंग (Sairang) शहर थेट राजधानी दिल्लीशी जोडले गेले आहे. राजधानी एक्सप्रेस आता मिझोरामपर्यंत धावणार आहे. मोदी म्हणाले की, ही केवळ रेल्वे लाईन नसून विकासाची जीवनरेषा आहे, जी मिझोरमच्या लोकांचे जीवनमान उंचावणार आहे. यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री देशभर करता येणार असून, शिक्षण व आरोग्याच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. या विकासामुळे रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.



मिझोरममध्ये लवकरच हेलिकॉप्टर सेवा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, लवकरच मिझोरममध्ये हवाई प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे या राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये पोहोचणे आता अधिक सोपे होईल. मोदी म्हणाले की, “गेल्या अकरा वर्षांपासून आमची सरकार ईशान्य भारताच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. या काळात ईशान्य भारत आता देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येत आहे.” गेल्या काही वर्षांत या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. अनेक राज्यांना प्रथमच रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, वीज पुरवठा, नळाचे पाणी, गॅस कनेक्शन, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मोदींनी स्पष्ट केले की, भारत सरकार सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी देत आहे. त्याचाच भाग म्हणून मिझोरममध्ये लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवासाची नवी सोय उपलब्ध होईल आणि पर्यटन व व्यापारालाही चालना मिळेल.

Comments
Add Comment

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६

Crocs Styling Tips : Crocs ला स्टायलिश लुक देण्यासाठी फॉलो करा 'या' ७ टिप्स...

१. Crocs म्हणजे फक्त आरामदायी (Comfortable) Footwear (फुटवेअर) नाही! योग्य स्टाईलिंग (Styling) केल्यास Crocs तुमच्या फॅशन (Fashion) लुकला चार चाँद

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या