शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका


मुंबई : शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने सडकून टीका केली आहे.


बंगळुरू शहरातल्या शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नामांतर करण्याचा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेसने सादर केला आहे. शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करावं असा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेसने सादर केला आहे. कर्नाटक काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने टीका केली आहे.


'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करणं याचा मी निषेध करतो. एकप्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकचं काँग्रेस सरकार करत आहे. याचं मला दु:ख आहे', असे महाराष्ट्राचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असल्यापासून आहे. त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलं होतं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्याप्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. तीच महाराजांना अपमान करण्याची परंपरा ही सातत्याने काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसत आहे. आम्ही याचा निषेध करतो. मी ईश्वराताला प्रार्थना करतो की त्याने काँग्रेसला सद्बुद्धी द्यावी', असेही मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं, असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशाप्रकारे कुठेतरी धार्मिक अशाप्रकारची विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेढ निर्माण करायचं, हे ते करणार नाही, बुद्धी त्यांना मिळावी, ही अपेक्षा', असे शेवटी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना