समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात होत असतात. पण यावेळी समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे महामार्गावरून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला, चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने महामार्गावर खिळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.


प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा.  मात्र प्रत्यक्षात प्रकरण काही वेगळेच होते. मुळात रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता संबंधित प्रशासन नेमकं काय कारवाई करतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले


समृद्धी मार्गावर पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटले. त्यामुळे समृद्धी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री ४ तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. जर पुलाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड्स का लावले नाही? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीनंतर आता दुरुस्तीच्या कामादरम्यान रस्त्यावर लावलेले खिळे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत आणि आता त्या भागातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.



नेमकं काय झालं?


खरं तर, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजी नगर येथील माळीवाडा इंटरचेंजजवळ रात्री उशिरा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. पुलावर लहान खड्डे पडल्यामुळे हायस्पीड वाहनांचे संतुलन बिघडू लागले. ते तात्पुरते सुधारण्यासाठी खिळे ठोकून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. यामुळे रात्री काही काळ मार्गाचा काही भाग बंदही ठेवण्यात आला होता. यादरम्यान, काही वाहनचालकांनी दुरुस्ती केलेल्या भागातून त्यांची वाहने वेगाने बाहेर काढण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अनेक वाहनांच्या टायरमध्ये खिळे घुसले आणि टायर पंक्चर झाले. ही घटना उघडकीस येताच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये आणि वाहन मालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला.  

याबद्दल दौलताबाद पोलिसांनी सांगितले की, सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तेथील वाहनांचे पंक्चर दुरुस्त केले. सध्या या प्रकरणात कोणतेही तक्रार पत्र देण्यात आलेले नाही. मात्र, समृद्धी महामार्ग माळीवाडा इंटरचेंजच्या संबंधित अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. सध्या, प्रशासनाने महामार्गावरील सर्व खिळे पूर्णपणे काढून टाकले आहेत आणि रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आता त्या भागातून वाहने सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंक्चर झालेल्या वाहनांचे मालक अजूनही निषेध करत आहेत आणि महामार्ग प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत.
Comments
Add Comment

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी