E-Water Taxi : काय सांगता? गेटवे ते जेएनपीए फक्त ४० मिनिटांत! ई-वॉटर टॅक्सीची धमाकेदार एंट्री; 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता सेवेत दाखल होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीए) हा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि झपाट्याने होणार आहे. सध्या या मार्गावर लाकडी बोटींमधून प्रवास करताना सुमारे एक तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असे. पण, ई-वॉटर टॅक्सीमुळे हा प्रवास फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांसोबतच जेएनपीएचे कर्मचारीदेखील या आधुनिक जलवाहतुकीचा लाभ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २२ सप्टेंबरपासून दोन ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएदरम्यान धावणार आहेत.



लाकडी बोटींना रामराम


सध्या गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएदरम्यान प्रवासासाठी लाकडी बोटींचा वापर केला जातो. मात्र या बोटी जुना झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. याशिवाय, या बोटींमधून प्रवास करताना किमान एक तास लागतो, तर हवामान बिघडल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास हा वेळ आणखी वाढतो. त्यामुळेच जेएनपीएने अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक पर्याय म्हणून ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ तब्बल २० मिनिटांनी कमी होऊन केवळ ४० मिनिटांत गेटवे ते जेएनपीए प्रवास शक्य होणार आहे.



परदेशी नाही, पूर्णतः ‘मेड इन इंडिया’


ई-वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खास बाब म्हणजे ही वॉटर टॅक्सी परदेशातून आयात केलेली नसून, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी तयार केली आहे. त्यामुळे ही सेवा केवळ पर्यावरणपूरक नाही तर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचं उत्तम उदाहरणही ठरणार आहे.



फक्त १०० रुपयांत जलप्रवास


ई-वॉटर टॅक्सी सेवेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात तयार झालेल्या या दोन टॅक्सींपैकी एक सौरऊर्जेवर तर दुसरी विजेवर धावणार आहे. या दोन्ही टॅक्सी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून प्रत्येकीत २० प्रवाशांची क्षमता आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए दरम्यान या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना सुमारे १०० रुपये इतकं भाडं मोजावं लागणार आहे. या ई-वॉटर टॅक्सींचे नियमित संचालन आणि देखभालीची जबाबदारी ‘भारत फ्रेट ग्रुप’कडे सोपवण्यात आली आहे.



मुंबईत ई-वॉटर टॅक्सीनंतर हायड्रोजन बोटी


भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी माहिती दिली की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांना ई-वॉटर टॅक्सीची सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध होणार आहे. याशिवाय, पुढील टप्प्यात चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याचीही तयारी सुरू आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा आदर्श निर्माण होईल.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.