आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस


मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा रुग्णाच्या मृत्यूचे मुख्य कारण असते, असे डॉक्टर सांगतात. कारण कॅन्सरवर केमो थेरपी आणि इतर औषधांनी उपचार करतेवेळी शरीरावर अनेक साईड इफेक्ट अर्थात प्रतिकूल परिणाम होतात. या त्रासातून बरे होण्यास अनेकदा काही आठवडे किंवा काही महिन्यांचा कालावधी लागतो. तोपर्यंतचा कालावधी हा अनेकदा जीवघेणा असतो. हा त्रासच रुग्ण आणि त्याच्या नातलगांना जास्त निराश करतो. पण या समस्येवर उपाय सापडला आहे. रशियात झालेल्या संशोधनामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.


रशियाने कर्करोगाला प्रतिबंध करणारी लस अर्थात कॅन्सरला प्रतिबंध करणारी लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. या लसचे रुग्णांवरील प्रयोग सुरू आहेत. प्रीक्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली असून पुढील टप्प्याचे प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंतच्या प्रयोगांमध्ये ट्युमरचा आकार ६० ते ८० टक्क्यांनी कमी करण्यात लस यशस्वी झाली आहे. यामुळे इतर औषधांच्या मदतीने रुग्णाला बरे करणे शक्य होत आहे.


रशियाची लस mRNA तंत्राद्वारे विकसित केली आहे. यात प्रत्येक रुग्णाच्या शरीरातून आधी RNA अर्थात रिबोन्यूक्लिक आम्ल घेतले जाते. या रिबोन्यूक्लिक आम्लाच्या मदतीने संबंधित रुग्णासाठी लस विकसित केली जाते. यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात पसरत असलेल्या कॅन्सरला प्रतिबंध करणारी लस विकसित करणे सोपे होते. लस कमालीची प्रभावी ठरते. कोलोन कॅन्सर, ब्रेन कॅन्सर ग्लियोब्लास्टोमा, स्किन कॅन्सर मेलेनोमा या आजारांवर रशियाची लस प्रभावी असल्याचे आढळले आहे. सध्या या लसची किंमत तीन लाख रुबल म्हणजेच अडीच लाख रुपये एवढी आहे. रशिया सरकार कॅन्सर रुग्णांना लस विनामूल्य देण्याबाबत विचार करत आहे.


कॅन्सरला हरवणाऱ्या रशियाच्या लसचे पहिल्या टप्प्याचे ह्युमन ट्रायल सप्टेंबर - ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. या प्रयोगाकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना