"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर सामन्यांच्या खिशाला कात्री लावून जातात. गेले कित्येक वर्षांपासून वाढत चाललेली ही सामन्य माणसांची ही आर्थिक चणचण आता काहीप्रमाणात कमी होणार आहे. कारण. महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जखमावर अखेरीस केंद्र सरकारने मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यात सामान्यांच्या हितावह अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिकिया देखील समोर आली. 'दिलेला शब्द मी पाळला, जे बोललो होतो ते करून दिले" असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले आहे.

जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल


२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीच्या करप्रणालीमध्ये अखेरीस बदल करण्यात आला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आता याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल' अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती


जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले पंतप्रधान मोदी?





"'स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी म्हटलं होतं की, आम्ही जीएसटीमध्ये पुढील पिढीसाठी सुधारणा आणण्याचा मानस करतो. केंद्र सरकारने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये व्यापक जीएसटी दरांचे तार्किक पुनर्रचना आणि प्रक्रिया सुधारणांचा समावेश आहे. त्याचे उद्दिष्ट सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

तसंच, 'जीएसटी कौन्सिल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही समाविष्ट आहेत, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात आणि सुधारणांचे प्रस्ताव एकत्रितपणे मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुनिश्चित होईल' अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Flood situation in Nepal : पूरग्रस्त नेपाळसाठी भारताची ‘एअर रिलीफ’; वायुसेनेने पोहोचवली 47.5 टन मदत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना

Citizens from Maharashtra stranded in Nepal : सागात अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

सागा : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले

New Delhi : नवी दिल्लीत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला अटक

मोहम्मद साहिल व समिराकडून केले जप्त 8 भारतीय सिमकार्ड नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची