हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष टीकाराम समरीत (वय २९, रा. खमारी, जि. भंडारा) हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी आला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले होते. परत आज शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ते हरिहर किल्ला येथे ट्रेकिंगसाठी आले होते.


यावेळी उतरत असताना सुमारे १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो साधारण शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वनविभाग व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या

ट्रेनच्या AC कोचमध्ये प्रवाशांसाठी नवी सुविधा, मळक्या ब्लँकेट्सचा त्रास संपला.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल