Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.


तसेच या आंदोलनाला आणखी एक वाढीव दिवस मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान प्रशासनानेही अतिशय सावधगिरीची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे आदेश सुट्टीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आले आहेत.


सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा तसेच गैरहजर असलेल्या पोलिसांनी तातडीने कामावर येण्याच्या सूचना या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे याचे नियोजन करताना पोलीसबळ अपुरे पडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे