Maratha Andolan: मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली, अटी व शर्ती लागू

मुंबई: मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली असून, मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित कार्यकर्त्यांसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली होती, जी आता संपली आहे. मात्र त्यानंतर काय असा प्रश्न आंदोलक तसेच जनसामान्यांना पडला होता. जो आता सुटला असून, जरांगे यांना उद्याही आंदोलन सुरू ठेवता येणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे.



उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली


उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदानमध्ये परवानगी मिळण्यासाठी  पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.



नियम आणि अटीवर आंदोलनाला परवानगी


मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांची संख्या ५ हजारांच्या आत ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम असून  मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखो मराठा आंदोलक संघटित झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असली तरी, अनेकांनी रिकामी जागा, रेल्वे स्थानक परिसर तसेच बसथांब्यांवर आसरा घेतला. दरम्यान मंत्रालय, सीएसएमटी परिसरात शेकडो आंदोलकांनी मोर्चा वळवून घोषणा दिल्या. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.



सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ


दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज झालेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा सदावर्ते यांनी जरांगेवर टिका केली. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, अटी व शर्तींचे पालन न केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.  त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा विचार करून पोलिसांनी क्रिस्टल टॉवर निवासस्थानाजवळ बंदोबस्त वाढवला आहे.


 
Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या