Maratha Andolan: मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली, अटी व शर्ती लागू

मुंबई: मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली असून, मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित कार्यकर्त्यांसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली होती, जी आता संपली आहे. मात्र त्यानंतर काय असा प्रश्न आंदोलक तसेच जनसामान्यांना पडला होता. जो आता सुटला असून, जरांगे यांना उद्याही आंदोलन सुरू ठेवता येणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे.



उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली


उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदानमध्ये परवानगी मिळण्यासाठी  पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.



नियम आणि अटीवर आंदोलनाला परवानगी


मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांची संख्या ५ हजारांच्या आत ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम असून  मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखो मराठा आंदोलक संघटित झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असली तरी, अनेकांनी रिकामी जागा, रेल्वे स्थानक परिसर तसेच बसथांब्यांवर आसरा घेतला. दरम्यान मंत्रालय, सीएसएमटी परिसरात शेकडो आंदोलकांनी मोर्चा वळवून घोषणा दिल्या. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.



सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ


दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज झालेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा सदावर्ते यांनी जरांगेवर टिका केली. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, अटी व शर्तींचे पालन न केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.  त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा विचार करून पोलिसांनी क्रिस्टल टॉवर निवासस्थानाजवळ बंदोबस्त वाढवला आहे.


 
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही