विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे,


या दुर्घटनेला २० तास उलटून गेले आहेत. इमारत कोसळल्याची दुर्घटनेची माहिती मिळताच या इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकांनी तातडीने येथे धाव घेतली होती. अनेकांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मृतांची नावे


लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष), सचिन निवळकर(४० वर्षे), सोनाली तेजाम(४१ वर्षे), दीपक सिंग बोहरा(२५ वर्षे), कशिश पव सहेनी(३५ वर्षे), शुभांगी पवन सहेनी(४० वर्षे), गोविंद सिंग रावत(२८ वर्षे), पार्वती सकपाळ(६० वर्षे)



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)



बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेने वसई-विरार परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शहरांमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, "रमाबाई अपार्टमेंट" सारख्या धोकादायक इमारतींमध्ये लोक का राहत होते आणि प्रशासनाने वेळोवेळी नोटीस देऊनही यावर कारवाई का केली नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित चुका आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली असल्याचे आरोप होत आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी खळबळ! प्रा. मोटेगावकर पुन्हा सीबीआयच्या रडारवर?

देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) आता आणखी गंभीर वळण घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. लातूरमधील

Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर मुंबई : गेल्या अनेक

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या