विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे,


या दुर्घटनेला २० तास उलटून गेले आहेत. इमारत कोसळल्याची दुर्घटनेची माहिती मिळताच या इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकांनी तातडीने येथे धाव घेतली होती. अनेकांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मृतांची नावे


लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष), सचिन निवळकर(४० वर्षे), सोनाली तेजाम(४१ वर्षे), दीपक सिंग बोहरा(२५ वर्षे), कशिश पव सहेनी(३५ वर्षे), शुभांगी पवन सहेनी(४० वर्षे), गोविंद सिंग रावत(२८ वर्षे), पार्वती सकपाळ(६० वर्षे)



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)



बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेने वसई-विरार परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शहरांमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, "रमाबाई अपार्टमेंट" सारख्या धोकादायक इमारतींमध्ये लोक का राहत होते आणि प्रशासनाने वेळोवेळी नोटीस देऊनही यावर कारवाई का केली नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित चुका आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली असल्याचे आरोप होत आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा