दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा लागू होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल अथवा इतर कोणतेही स्मार्ट डिव्हाईस वापरता येणार नाहीये.यापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली असून, दक्षिण कोरियाचाही त्यात समावेश झाला आहे.

दक्षिण कोरियात शाळांमध्ये मोबाईल बंदीचा कायदा पुढील वर्षी म्हणजे मार्च २०२६ पासून अंमलात येणार आहे. खासदार, पालक आणि शिक्षकांकडून शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाईल वापराबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये अनेक शाळांनी मोबाईल बंदीचा निर्णय लागू केला.

मुलांना मोबाईलचे व्यसन जडू लागले असून, त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मनावर होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरू लागली आहे. कारण त्यांचा अभ्यासाचा वेळही मोबाईल वापरण्यातच चालला आहे. मोबाईलची मुलांना लागत असलेलं व्यसन चिंताजनक असून, दक्षिण कोरियाच्या कायदेमंडळाने हा निर्णय घेतला. दक्षिण कोरियाच्या संसदेने बुधवारी हे विधेयक मंजूर केले. १६३ पैकी ११५ मते विधेयकाच्या बाजूने पडली.

दक्षिण कोरियापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली आहे. फिनलँड, फ्रान्सने मर्यादित स्वरूपात निर्बंध घातलेले आहेत. तिथे लहान मुलांनाच शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. तर नेदरलँड्स आणि चीनमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल