दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप


मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी जलाभिषेक करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मोठ्या आनंदाने, वाजत-गाजत, ढोल-ताशा आणि टाळ, मृदंगाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करत भाविकांनी आपल्या लाड्क्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील तलाव, कृत्रिम तलाव, समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची तुफान गर्दी होती. दुपारनंतर वाजत-गाजत, गुलाल उधळत, येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रसादाचे वाटप करत कुटुंबे विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस दल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्यातर्फे पाणी, अन्नदान सेवा प्रदान करण्यात आली होती.


Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास