दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप


मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी जलाभिषेक करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मोठ्या आनंदाने, वाजत-गाजत, ढोल-ताशा आणि टाळ, मृदंगाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करत भाविकांनी आपल्या लाड्क्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील तलाव, कृत्रिम तलाव, समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची तुफान गर्दी होती. दुपारनंतर वाजत-गाजत, गुलाल उधळत, येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रसादाचे वाटप करत कुटुंबे विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस दल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्यातर्फे पाणी, अन्नदान सेवा प्रदान करण्यात आली होती.


Comments
Add Comment

GST: आजपासून तुमचे किती पैसै वाचणार? दररोज लागणाऱ्या या वस्तू झाल्या स्वस्त...

मुंबई: आजपासून देशभरात अनेक दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन

Navratri 2025 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ,जाणून घ्या नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व

मुंबई: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। अर्थ : सर्व

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती - मुख्यमंत्री

मुंबई : देशात उद्या, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही