विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील चार मजली जुनी इमारत मध्यरात्री कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत.


स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई इमारतीमध्ये एका कुटुंबात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे अनेक पाहुणे तिथे जमले होते. अचानक इमारत कोसळल्याने सुमारे २०-२५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचा अंदाज आहे.





घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगी आणि एका तरुणाचा समावेश आहे. इतर ९ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बचावकार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत कारण घटनास्थळाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे मदत पोहोचण्यास अडथळे येत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा या भागातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने या घटनेची चौकशी सुरू केली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

NSE पाठोपाठ BSE आता BKC मध्ये येणार

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये व्यावसायिक जागेची मागणी प्रचंड वाढत असताना, बीएसईने मुंबईत विस्तार

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :