विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील चार मजली जुनी इमारत मध्यरात्री कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत.


स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई इमारतीमध्ये एका कुटुंबात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे अनेक पाहुणे तिथे जमले होते. अचानक इमारत कोसळल्याने सुमारे २०-२५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचा अंदाज आहे.





घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगी आणि एका तरुणाचा समावेश आहे. इतर ९ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बचावकार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत कारण घटनास्थळाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे मदत पोहोचण्यास अडथळे येत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा या भागातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने या घटनेची चौकशी सुरू केली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी