Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरेबियाहून आला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील कस्टम विभागाने सौदी अरेबियाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्यानंतर त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. ज्याचे वजन १.०७ किलो आहे आणि त्याची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

कस्टमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले सोने हे प्रवाशाच्या शरीरात लपवलेले आढळले. गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई कस्टमच्या विमानतळ आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला थांबवले. हा प्रवासी सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आला होता. झडती दरम्यान त्यांना सदर व्यक्तीच्या शरीरात लपवलेले सोन्याचे मेण सापडले. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासेही होऊ शकतात.

मुंबई विमानतळावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही डीआरआयने गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करताना एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक