Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरेबियाहून आला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील कस्टम विभागाने सौदी अरेबियाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्यानंतर त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. ज्याचे वजन १.०७ किलो आहे आणि त्याची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

कस्टमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले सोने हे प्रवाशाच्या शरीरात लपवलेले आढळले. गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई कस्टमच्या विमानतळ आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला थांबवले. हा प्रवासी सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आला होता. झडती दरम्यान त्यांना सदर व्यक्तीच्या शरीरात लपवलेले सोन्याचे मेण सापडले. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासेही होऊ शकतात.

मुंबई विमानतळावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही डीआरआयने गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करताना एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी