Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरेबियाहून आला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील कस्टम विभागाने सौदी अरेबियाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्यानंतर त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. ज्याचे वजन १.०७ किलो आहे आणि त्याची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

कस्टमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले सोने हे प्रवाशाच्या शरीरात लपवलेले आढळले. गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई कस्टमच्या विमानतळ आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला थांबवले. हा प्रवासी सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आला होता. झडती दरम्यान त्यांना सदर व्यक्तीच्या शरीरात लपवलेले सोन्याचे मेण सापडले. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासेही होऊ शकतात.

मुंबई विमानतळावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही डीआरआयने गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करताना एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.
Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित