भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला


कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने छापे टाकले. छाप्यादरम्यान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांनी भिंतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ईडीने नाट्यमयरीत्या सोमवारी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी त्यांचे फोनही घरामागील नाल्यात फेकून दिले. नंतर अधिकाऱ्यांनी हा फोन जप्त केला.


पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आमदार साहा यांच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले. ईडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल अधिकाऱ्यांनी झाडे आणि कचरा पसरलेल्या परिसरातून ही कारवाई करण्यात आली. बुरवान विधानसभा मतदारसंघातील आमदाराला एजन्सीला सहकार्य न केल्याबद्दल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


दरम्यान, संबंधित आमदारांच्या काही नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. साहा यांना २०२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोने घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. कोलकाता उच्च न्यायालयाने गट 'क' आणि 'ड' कर्मचारी, इयत्ता ९ वी ते १२वी पर्यंतचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.


या प्रकरणात ईडीने आतापर्यंत पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांची कथित सहकारी अर्पिता मुखर्जी, तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्यासह काही इतरांना या प्रकरणात अटक केली. ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने चॅटर्जी यांना निलंबित केले. तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपपत्रे दाखल केली आहेत.

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत