आता मेट्रो-३ रविवारीही सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३ मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा सकाळी ८.३० वाजता सुरू होते. पण आता मात्र ३१ ऑगस्टपासून मेट्रो ३ ची सेवा रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे.


मेट्रो-३ मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो ३ धावते. तर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० या वेळेत सुरू राहते. सुट्टीच्या दिवशी सकाळी मेट्रोने प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची काहीशी गैरसोय होत होती. पण आता मात्र प्रवाशांची ही गैरसोय आता दूर होणार आहे.


कारण, आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही मेट्रो ३ ची सेवा सकाळी लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मेट्रोची सेवा सकाळी ८.३० ऐवजी सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब आहे. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत भाविक गणपती दर्शनासाठी येत-जातात. तर देखावा पाहण्यासाठी जाणाऱ्या-येणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. अशावेळी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी एमएमआरसीएलने सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ होणार आहे. दीड तासांने सेवा कालावधी वाढणार असल्याने फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. ७ सप्टेंबरपासून मात्र रविवार ते सोमवार दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत धावणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे