Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर


मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. चार दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतली होती. मात्र पावसाने मुंबई तसेच उपनगरात पुन्हा एकदा जोर धरला आहे.


सोमवारी पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळत आहे. वाहनांचा वेग यामुळे कमी झाला आहे. मुंबईच्या लोकल वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वे ५ ते ७ मिनिटे उशिराने सुरू आहेत तर हार्बर रेल्वे ५ मिनिटे उशिराने आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही ५ मिनिटे उशिराने रेल्वे सुरू आहेत.


मंगळवारी आणि बुधवारी मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरामध्ये जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.


Comments
Add Comment

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर