टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही युझर्सना अचानक टिकटॉकची वेबसाईट ॲक्सेस करता येऊ लागल्याने सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण आणि प्रश्नांचे मोहोळ उठले आहे.


भारत सरकारने २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी ॲप्सवर बंदी घालताना डेटा प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने घातलेली ही बंदी अजूनही कायम आहे.


जोपर्यंत सरकारकडून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत टिकटॉकचे पुनरागमन अशक्य आहे. कंपनीकडून किंवा भारत सरकारकडून यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. वेबसाईटचा मर्यादित ॲक्सेस हा आशेचा किरण असला तरी, तो पुनरागमनाची हमी देत नाही.


त्यामुळे, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील. टिकटॉकच्या चाहत्यांना आणि कंटेंट क्रिएटर्सना यासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व