गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद! ५१०३ बसेस झाल्या फुल्ल

मुंबई: येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


"गणपती बाप्पा , मुंबईचे कोकणवासीय व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सरवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते". असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.


अर्थात,गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. तसेच "सर्व गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास सुखकर होवो!" अशा शुभेच्छा श्री. प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन

'अजित पवारांच्या विमान अपघातावरून राऊत, रोहित पवारांची स्टंटबाजी'

- भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रखर टीका अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत

Budget Session : आरोग्य केंद्रात आता 'कायाकल्प'; ४६ पैकी २८ केंद्रांचा कायापालट होणार, मंत्री बोर्डीकर यांचे आश्वासन

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या प्रसूती प्रकरणाचे

Budget Session : डहाणूतील 'त्या' प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन

- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार! मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या