सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातपिके आडवी

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हळवी पिके हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी विभागाने अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली नाही, मात्र शेकडो एकरवरील हळवी भातपिकांचे नुकसान होऊ लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.९) दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोपून काढले आहे. सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय जिल्ह्यात उर्वरित भागाला देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. उभी पिके आडवी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड आहे.

त्यातील ५ ते ६ हजार हेक्टर भातपिकाची पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आली होती. हे पीक महिनाभरापूर्वीच परिपक्व झालेले आहे. सततच्या पावसामुळे हे पीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने सप्टेंबर अखेरीपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहे. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. असे असले तरी शेकडो एकर भातपिकांचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत