संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात ३२ दिवसांत २१ बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १२ आणि राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली.


पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत २८ आणि २९ जुलै रोजी तर राज्यसभेत २९ आणि ३० जुलै रोजी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा झाली. लोकसभेत १८ तास ४१ मिनिटे तर राज्यसभेत १६ तास २५ मिनिटे 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत ७३ सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये ६५ सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिले.


लोकसभेत १८ ऑगस्ट रोजी विकसित भारत २०४७ साठी अंतराळ कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधकांनी सतत गोंधळ घातल्यामुळे ही चर्चा अपूर्णच राहिली. विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालण्यावर जास्त भर दिला. यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लोकसभेत ३१ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.


Comments
Add Comment

Jammu Kashmir Drug Case : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर ड्रग्जचे नवे हॉटस्पॉट! १३ लाखांहून अधिक युवक ड्रग्जच्या आहारी

जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक

India Population : अधिक मुले जन्माला घाला, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; पण वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार नवे प्रश्न

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा