पाली-खोपोली महामार्गावर जीवघेणे खड्डे

तत्काळ उपाययोजन करण्याची ग्रामस्थांची मागणी


गौसखान पठाण


सुधागड : पाली-खोपोली महामार्गावरील खड्ड्यांनी सुधागड तालुक्यातील जनतेचे जीवन अक्षरशः संकटात टाकले आहे. प्रवास म्हणजे जीवघेणं आव्हान बनले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत,
तर काहींनी आपला जीव गमावला आहे.


रुग्णवाहिका अडखळत आहेत, विद्यार्थी उशिरा पोहोचत आहेत, आणि सामान्य नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. गणेश चतुतर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आजही या मार्गावर खड्ड्यांची अवस्था जशीच्या तशी आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग यांचे ठोस दुर्लक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आहे.


परळी ग्रामपंचायत सदस्य राजेश परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. 'गेल्या कित्येक बैठका, आढावा सभा, विशेष आम सभा झाल्या, पण एमएसआरटीसीचे अधिकारी एकदाही उपस्थित राहिले नाहीत. हे केवळ निष्क्रियता नाही, तर जनतेच्या जिवाशी थट्टा आहे,' असा थेट आरोप त्यांनी केला.


परदेशी यांनी स्पष्ट इशारा दिला की, 'खड्डे तत्काळ दुरुस्त करण्यात आले नाहीत, तर येत्या तीन दिवसांत शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने या खड्ड्यांमध्ये कमळाची फुले लावण्यात येतील. आणि यापुढे एकही अपघात झाला, तर एमएसआरटीसी विरोधात थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल.' ते पुढे म्हणाले, “निवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडतो, पण निवडून आल्यानंतर जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली जाते. आमदार, खासदार याकडे लक्ष देतील का? की खड्ड्यांतच जनतेचा आवाज


गाडला जाणार?'
या मार्गावरील खड्ड्यांमुळे केवळ वाहतूकच विस्कळीत झाली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जनतेचा संयम संपत चालला आहे. आता या खड्ड्यांवर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढत असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने

रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अलिबाग  : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा