
मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई पोलिसांच्या 'आर्थिक गुन्हे शाखेने' आज सकाळी बोरीवली येथील कंत्राटदार शेरसिंग राठोडला अटक केली. त्याला नंतर 'एस्प्लेनेड' न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्यातील ही तिसरी अटक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हा नदीतील गाळ काढण्याच्या कामात वाढीव बिले आणि इतर अनियमिततांमध्ये गुंतलेला होता, असा त्याच्यावर आरोप आहे. या घोटाळ्यात अनेक कंत्राटदार आणि नागरी अधिकारी सहभागी असल्याचा आरोप असून, 'ई.ओ.डब्ल्यू.'कडून 'आर्थिक व्यवहारांच्या' तपासणीसाठी सक्रिय तपास सुरू आहे आणि गैरवापर केलेल्या निधीच्या लाभार्थ्यांची ओळख पटवली जात आहे.

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा झाली असून, त्यामधील ४ कामगारांचा ...
सूत्रांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. 'अंमलबजावणी संचालनालय' देखील नदीच्या साफसफाई प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा समांतर तपास करत आहे. याआधी 'ईडी'ने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या घरी छापा टाकला होता आणि 'वोडार इंडिया लिमिटेड'च्या अटकेत असलेल्या आरोपी केतन कदमसोबतच्या त्याच्या आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्या 'आर्थिक व्यवहारा'ची तपासणी केली होती.
'व्हिर्गो स्पेशालिटीज प्रा. लि.'चा एक आरोपी जय जोशी याला स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जोशीने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये नेदरलँड्समधून ८ कोटी रुपयांना आयात केलेली एक मशीन पुरवली होती, जी या प्रकल्पात वापरली गेली.