आरबीआयच्या भाकीतालाही मागे टाकत अर्थव्यवस्था ६.८ ते ७.००% वेगाने वाढणार!

SBI Research Report कडून प्रसिद्ध झाली आकडेवारी


प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था केवळ चालत नाही तर पळत असल्याचे नवीन एसबीआय अहवालात स्पष्ट झाले आहे. नव्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ६.८% ते ७% कदाचित वाढ नोंदवली आहे.एसबीआय शोध अहवाल (SBI Res earch Report) मधील माहितीनुसार, ही वाढ लक्षणीय आहे. विशेषतः आरबीआयच्या ६.५% वाढीच्या अनुमानापेक्षाही ही वाढ अधिक झाली आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, अर्थव्यवस्था ६.८% वाढताना सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) मध्ये ६.९% वाढ झा ली आहे. तर ग्रॉस व्हॅल्यु अँडेड (GVA) ६.५% वर कायम आहे. या आर्थिक आधारीत कामगिरीवर एसबीआय रिसर्चच्या मते, आगामी जीडीपी दरात ६.९% इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ होऊ शकते.


या आर्थिक मॉडेलमध्ये मागील तिमाहीतील अंदाजाशी संलग्नच वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 'सुरूवातीला पहिल्या तिमाहीत (Q1FY26) मध्ये ६.८ ते ७.००% जीडीपी वाढीचा अंदाज होता.' असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले होते. त्याला अनुसरू नच अर्थव्यवस्थेत ही वाढ कायम आहे. वेगवेगळ्या आर्थिक निकषांवर आधारित ही वाढ आहे.अर्थव्यवस्थेतील ही वाढ केवळ आर्थिक आकडेवारीवर नाही तर ही वाढ संतुलित,मध्यम वेगाने, व वातावरणाला साजेसे स्वरूप घेणारी ठरली गेल्याने या अर्थव्यवस्थेच्या ६.८% ते ७.००% वाढ ही मोठी समजली जाऊ शकते. मात्र संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ चा विचार केल्यास ही ६.३% वाढ वेगाने राहू शकते असे एसबीआय रिसर्चने म्हटले आहे. अहवालातील नोंदणीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२६ मधील चौथ्या तिमाहीत वाढीचा वेग ०. २% मंदावू शकतो.


अहवालातील अतिरिक्त माहितीनुसार, रिअल व नॉमिनल (नाममात्र) मधील अंतरही आता कमी होत आहे. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष २०२३ मध्ये हे अंतर १२% पूर्णांकाने होते ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये घसरून ३.४% अंतर उरले आहे. तरीसुद्धा, रिपोर्टमध्ये म्हट ल्याप्रमाणे, महागाई कमी राहणार असून ही दोन्ही जीडीपी मोजमापातील दरी आणखी कमी होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये नॉमिनल जीडीपी दर ८% घसरू शकतो. तर रिअल जीडीपी दर ६.८% ते ७.००% ब्रँकेटमध्ये राहण्याची शक्यता अहवालात अखे रीस नोंदवली गेली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची

शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले