आरबीआयच्या भाकीतालाही मागे टाकत अर्थव्यवस्था ६.८ ते ७.००% वेगाने वाढणार!

  55

SBI Research Report कडून प्रसिद्ध झाली आकडेवारी


प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था केवळ चालत नाही तर पळत असल्याचे नवीन एसबीआय अहवालात स्पष्ट झाले आहे. नव्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ६.८% ते ७% कदाचित वाढ नोंदवली आहे.एसबीआय शोध अहवाल (SBI Res earch Report) मधील माहितीनुसार, ही वाढ लक्षणीय आहे. विशेषतः आरबीआयच्या ६.५% वाढीच्या अनुमानापेक्षाही ही वाढ अधिक झाली आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, अर्थव्यवस्था ६.८% वाढताना सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) मध्ये ६.९% वाढ झा ली आहे. तर ग्रॉस व्हॅल्यु अँडेड (GVA) ६.५% वर कायम आहे. या आर्थिक आधारीत कामगिरीवर एसबीआय रिसर्चच्या मते, आगामी जीडीपी दरात ६.९% इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ होऊ शकते.


या आर्थिक मॉडेलमध्ये मागील तिमाहीतील अंदाजाशी संलग्नच वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 'सुरूवातीला पहिल्या तिमाहीत (Q1FY26) मध्ये ६.८ ते ७.००% जीडीपी वाढीचा अंदाज होता.' असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले होते. त्याला अनुसरू नच अर्थव्यवस्थेत ही वाढ कायम आहे. वेगवेगळ्या आर्थिक निकषांवर आधारित ही वाढ आहे.अर्थव्यवस्थेतील ही वाढ केवळ आर्थिक आकडेवारीवर नाही तर ही वाढ संतुलित,मध्यम वेगाने, व वातावरणाला साजेसे स्वरूप घेणारी ठरली गेल्याने या अर्थव्यवस्थेच्या ६.८% ते ७.००% वाढ ही मोठी समजली जाऊ शकते. मात्र संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ चा विचार केल्यास ही ६.३% वाढ वेगाने राहू शकते असे एसबीआय रिसर्चने म्हटले आहे. अहवालातील नोंदणीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२६ मधील चौथ्या तिमाहीत वाढीचा वेग ०. २% मंदावू शकतो.


अहवालातील अतिरिक्त माहितीनुसार, रिअल व नॉमिनल (नाममात्र) मधील अंतरही आता कमी होत आहे. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष २०२३ मध्ये हे अंतर १२% पूर्णांकाने होते ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये घसरून ३.४% अंतर उरले आहे. तरीसुद्धा, रिपोर्टमध्ये म्हट ल्याप्रमाणे, महागाई कमी राहणार असून ही दोन्ही जीडीपी मोजमापातील दरी आणखी कमी होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये नॉमिनल जीडीपी दर ८% घसरू शकतो. तर रिअल जीडीपी दर ६.८% ते ७.००% ब्रँकेटमध्ये राहण्याची शक्यता अहवालात अखे रीस नोंदवली गेली आहे.

Comments
Add Comment

‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू मुंबई : केरळ राज्यातील एका

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या

मिठी नदीच्या घोटाळ्यातील तिसरा आरोपी अटकेत!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात

बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा