नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच होणार सुरु, सिडको अधिकाऱ्यांची मोठी माहिती

बहुचर्चित नवी मुंबईत तयार होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळावरून सुरुवातीला जागेवरून आणि नंतर नावावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र अखेर ऑक्टोबरमध्ये विमानतळाचं उद्घाटन होणार असून डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी हे विमानतळ सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली.


या विमानतळामुळे मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच मोठा फायदा होणार आहे. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून, आधी त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. पण आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुढे गेली असून ऑक्टोबरमध्ये शुभारंभ होण्याचं सांगण्यात आलं आहे. विमानतळाचं काम पूर्ण न झाल्याने याच्या उद्घाटनाचा मुहुर्त लांबणीवर गेला आहे.


नवी मुंबईतील हे विमानतळ व्यापारासाठी मोठं केंद्र ठरणार आहे. या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कनेक्टिव्हिटी वाढणार असून महाराष्ट्रात व्यापाराच्या नव्या संधी वाढून याचा फायदा होईल. केवळ राज्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठीही हे विमानतळा महत्त्वाचं ठरणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.


विमानतळावर प्रवासी किंवा मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी अत्यावश्यक असते. एरोड्रोम परवाना हा धावपट्टीची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, पायाभूत सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, अग्निशमन व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, कस्टम्स व इमिग्रेशन तसेच पर्यावरणीय मानकांसाठी अधिकृत प्रमाणपत्र असते.


पुढील काही दिवसांत हे प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर ‘ऑपरेशनल रेडिनेस ॲण्ड एअरपोर्ट ट्रायल्स’ (ओआरएटी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होईल. त्यानंतर साधारण डिसेंबरच्या मध्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्वास सिंघल यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि