‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू


मुंबई : केरळ राज्यातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय ‘रस्त्यावर खड्डे असतील, तर टोल वसूल करता येणार नाही’ असा आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रात कार्यवाहीच्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात गुरूवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली.


विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्याच्या विधी आणि न्याय विभागामार्फत सविस्तर अभ्यासून पाहिला जाणार आहे. प्राथमिक स्तरावर याबाबत चर्चा सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये एका राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत खराब स्थिती लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने त्या मार्गावरील टोल वसुली चार आठवड्यांसाठी थांबवण्याचा आदेश दिला होता.



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र,सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. याच धर्तीवर महाराष्ट्रातही टोलवसुली होत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न लक्षात घेऊन टोलमाफीसंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही