‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू


मुंबई : केरळ राज्यातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय ‘रस्त्यावर खड्डे असतील, तर टोल वसूल करता येणार नाही’ असा आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रात कार्यवाहीच्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात गुरूवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली.


विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्याच्या विधी आणि न्याय विभागामार्फत सविस्तर अभ्यासून पाहिला जाणार आहे. प्राथमिक स्तरावर याबाबत चर्चा सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये एका राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत खराब स्थिती लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने त्या मार्गावरील टोल वसुली चार आठवड्यांसाठी थांबवण्याचा आदेश दिला होता.



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र,सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. याच धर्तीवर महाराष्ट्रातही टोलवसुली होत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न लक्षात घेऊन टोलमाफीसंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे.

Comments
Add Comment

विरोध डावलून सात वर्षांपूर्वीच बांधलेला उड्डाणपूल पाडण्यास बीएमसीची मंजूरी

मुंबई: बीएमसीने गोरेगावमधील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल पाडण्यासाठी तत्त्वतः परवानगी दिली आहे. सात

खूशखबर! मुंबईतील तलावांमध्ये ९८ टक्के जलसाठा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी पातळी ९८

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार

मुंबई : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन

राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व

Vastu Tips : पूजाघरात या चुका टाळा, अन्यथा घरात नांदेल गरिबी आणि समस्या!

मुंबई : प्रत्येक घरात पूजाघर किंवा देवघर हे एक पवित्र स्थान मानले जाते. या जागेतून घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि

जगातील पहिले महिला नौकायन अभियान मुंबईत सुरू

मुंबई: ११ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहासाची नोंद झाली, जेव्हा जगातील पहिले त्रि-सेवा सर्व-महिला नौकायन अभियान, "समुद्र