म्हाडाच्या एका घरासाठी तब्बल १९ अर्ज


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद


मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. ठाणे, वसई, कल्याण लाणि नवी मुंई या ठिकाणांतील ५,२८५ घरांसाठी आतापर्यंत तब्बल १ लाख ३, हजार १६० अर्ज म्हाडाकडे आले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६९२ जणांनी अनामत रक्कमेसेह अर्ज भरले आहेत. अजून नऊ दिवस अर्व भरण्याची मुदत शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडाला लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा १९ पट जास्त अर्न मिळाले आहेत. विशेष म्हणने, यावेळी पहिल्यांदाच मुंबई मंडळाइतकीच मागणी कोकण मंडळाच्या पर्यसाठी दिसत आहे.


या सोडतीत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध आहेत. त्यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ घरं, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्लस स्वरुपातील १,६७७ घरे आणि ५० टक्के योजनेअंतर्गत ४१ घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.


ठाणे, डबिवली, कल्याण, टिटवाला वाणि नवी मुंबईसारख्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असून त्यांची किंमत ९.५० लाखांपासून ते ८५ लाख रुपयांपर्यंत आहे. आज बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ३. हजार १६० जणांनी अर्ज भरले तर त्यापैकी त्यापैकी ६९ हजार ६९२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज भरले आहेत. घरांसाठी इच्छुक अर्जदारांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) अर्ज करता येणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येईल. अनामत रकमेसह भरलेल्या अर्जांची सोडत १८ सप्टेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. 


Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा