आगमन गणरायाचे, नियोजन एसटी महामंडळाचे

गणेशोत्सवासाठी सुटणार ५ हजारांहून अधिक एसटी बसेस


स्वप्नील पाटील


पेण : आषाढी एकादशी आणि राखी पौर्णिमेच्या यशस्वी कामगिरीनंतर आता गणेशोत्सवासाठी देखील राज्याचे एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी एसटी महामंडळाने ५ हजारांहून अधिक फेऱ्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये ५ हजार गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार असल्याने प्रवाशांमधून समाधानाचे सुरू ऐकायला मिळत आहेत.


यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून जरी असला तरी एसटी महामंडळाने २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत चार दिवसांत पाच हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्यांसाठी गाड्या तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये आधीच मुंबईमधून १५००, पालघर मधून ५०० तर ठाणे येथून २००० हून अधिक असे एकूण ४ हजार ग्रुपिंग बुकिंग एसटी महामंडळाकडे झाले आहे. तर ७०० हून अधिक गाड्या या गणेशोत्सव काळातील कोकणवासीयांसाठी इतर प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात आल्या.


तर रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी देखील रायगड एसटी महामंडळ पनवेलहून इतर गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती रायगड विभाग कार्यालयातून मिळाली आहे. एकंदरीत एसटी महामंडळ गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेऱ्यांचे नियोजन केले आहे.


कोकणवासीय गणेशभक्तांसाठी नियोजित एसटी बसेस


मुंबई ग्रुप बुकिंग १५३६         एसटी फेऱ्या - २६७           एकूण फेऱ्या - १८०३
पालघर ग्रुप बुकिंग ५३५       एसटी फेऱ्या - ७५              एकूण फेऱ्या - ६१०
ठाणे ग्रुप बुकिंग २१२२          एसटी फेऱ्या - ४३५            एकूण फेऱ्या - २५५७
एकूण ग्रुपिंग फेऱ्या ४१९२     एकूण इतर फेऱ्या - ७७७   एकूण फेऱ्या - ४९७०
Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या