आशिया कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची आज (१९ ऑगस्ट, २०२५) घोषणा होणार आहे. यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १८ ऑगस्टला विधान जारी केले आहे. मुंबईत मंगळवारी १९ ऑगस्टला वरिष्ठ पुरुष संघाची समिती बीसीसीआय मुख्यालयात पुरुष आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी बैठक घेतील.


बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. यात कर्णधार आणि निवड समितीच्या प्रमुखांचा समावेश असेल. भारतीय संघात १७ खेळाडूंना संधी मिळू शकते. जर १५ खेळाडूंची निवड झाली तर कोणाला संघात ठेवावे आणि कोणाला बाहेर बसवावे याबाबतचा निर्णय कठीण असणार आहे.


या वर्षीचा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असल्यामुळे खेळाडूंच्या निवडीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. भारताचे नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत हा संघ खेळणार असल्याने निवड समितीसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.



या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह:


शुभमन गिल: इंग्लंड दौऱ्यात कसोटी कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला शुभमन गिल टी-२० संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीच्या जोडीवर विश्वास दाखवू शकते.


मोहम्मद सिराज: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्यानंतरही मोहम्मद सिराजला टी-२० संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याचे टी-२० मधील अलीकडचे प्रदर्शन फारसे चांगले नाही. वेगवान गोलंदाजीच्या फळीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.


श्रेयस अय्यर: दुखापतीतून परतलेला आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर टी-२० संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.



गौतम गंभीरची भूमिका:


नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. निवड समितीच्या बैठकीत गंभीर काही खेळाडूंच्या समावेशासाठी आग्रही असू शकतात, असे मानले जाते. विशेषतः शुभमन गिलच्या निवडीसंदर्भात त्यांचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.


आशिया कपमध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.



आशिया कपसाठी भारताचा संभाव्य संघ


सूर्यकुमार यादव (कप्तान), अभिषेक शर्मा, संजू सैमसन, यशस्वी जायसवाल/शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जितेश शर्मा, हर्षित राणा, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील