जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ४७४ कोटी रुपयांचा विमा

  48

मुंबई : गणेशोत्सवाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अनेक मोठ्या गणेशमूर्तींचे मंडपांमध्ये आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या जीएसबी गणेश मंडळाने ४७४ कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी या मंडळाने ४०० कोटींचा विमा उतरवला होता. मात्र यंदा या विम्यात आणखी ७४ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीने जीएसबी गणेश मंडळासाठी हा विमा काढला आहे. यंदाच्या विम्यासाठी किती रुपये प्रिमियम आहे हे सांगण्यात आलं नाही. गोपनीयतेच्या कारणास्तव जीएसबी मंडळाने ४७४ कोटी रुपयांच्या विम्यासाठीचा प्रिमियम सांगण्यास नकार दिला आहे.

जीएसबी मंडळाकडे ६७ कोटींचे दागिने असल्याची माहिती आहे. सोनं आणि दागिन्यांचं मूल्य वाढल्याने यंदाच्या वर्षीचा विमाही वाढला आहे. जीएसबी मंडळातील स्वयंसेवक, पुजारी, आचारी, सुरक्षा कर्मचारी या लोकांनाही विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबतच नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचाही या विम्याच्या रकमेत समावेश आहे. ४७४ कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांसह आग, भूकंप, अपघात अशा सर्व आपत्तीचा विचार करुन हा विमा काढण्यात आला आहे.
Comments
Add Comment

इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याचे कार्य सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा संपन्न मुंबई: इतिहासाशी नवीन पिढीला

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी

मुंबई, ठाण्यात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; मंगळवारी शाळांना सुट्ट्या जाहीर

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई मनपांसह पालघर व बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी मुंबई : सलग तिसऱ्या

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात (State Disaster Management Cell)

मुंबईत पावसाची धुमश्चक्री, मेट्रो ठरली तारणहार!

मुंबई: सोमवारी शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना, ज्यामुळे रस्ते नद्यांसारखे झाले आणि प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प

विमान प्रवासावर पावसाचा परिणाम!

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी, सततच्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज