नायजेरियामध्ये बोट उलटली, ४० लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू


अबुजा: नायजेरियामध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटून ४० लोक बेपत्ता झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियातील नायजर राज्यातील शिरोरो भागात ही दुर्घटना घडली. ही बोट कोगी राज्यातील एका बाजाराकडे जात होती, त्यावेळी ती नदीत उलटली. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक आपत्कालीन सेवा एजन्सी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य वेगाने सुरू आहे. मात्र, या भागात सशस्त्र गटांचा वावर असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.


नायजेरियामध्ये पावसाळ्याच्या काळात जुन्या आणि क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या बोटींमधून प्रवास करताना अशा दुर्घटना वारंवार घडतात. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी अंतर्देशीय जलमार्गांच्या देखरेखीची व्याप्ती वाढवण्याचे आणि रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.


Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील