श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

  32

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला . मिनाक्षी यांनी प्रसंगावधान राखत मुलासह रस्त्यावरून पळ काढत आपला जीव वाचवला . या घटनेत त्यांची दुचाकी गाडी जळून खाक झाली .


याबाबत मिनाक्षी सकट यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता आपला मुलगा सार्थक याच्यासह स्वतःच्या हिरो-होंडा प्लेझर स्कुटीवरून वडाळी रोडने घरी परतत असताना पोटे मळ्याजवळील कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली.

त्यावेळी अंधारात एक इसम टॉर्च चमकवत असल्याने त्यांची गाडी घसरली. लगेचच गावातील ओळखीचा शरद लाटे हा धावत आला. त्याने हातातील बाटलीतील पेट्रोल मिनाक्षी यांच्या अंगावर आणि स्कुटीवर फेकले. तसेच केस धरून मारहाण केली व "माझ्यावर दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली.


यानंतर आरोपीने माचीसची काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली. मिनाक्षी सकट यांनी प्रसंगावधान राखत बाजूला पळ काढल्याने त्या वाचल्या, मात्र पेटलेली काडी त्यांच्या स्कुटीवर पडून स्कुटी जळून खाक झाली. यावेळी त्यांच्या साडीला देखील आग लागली , मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत जळणाऱ्या वस्त्रांवर हाताने झटके देऊन आग विझवली.


घटनास्थळावर मोठ्या आवाजात आरडाओरडा सुरू झाल्याने आरोपी शरद लाटे हा घटनास्थळावरून पळाला व एका अनोळखी इसमाच्या मोटारसायकलवर बसून सुरोडी रोडच्या दिशेने फरार झाला.


मीनाक्षी सकट या मातंग समाजातील असून, ग्रामसभेत जातीवरून अपमानित करणे, त्यांच्या वडिलोपार्जित जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करणे, तसेच पोकलेन लावून वाढदिवस साजरा करणे या कारणांवरून यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संदीप वागस्कर, विलास वागस्कर व शरद लाटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा राग मनात धरूनच हा पेट्रोल हल्ला झाल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी मिनाक्षी सकट यांनी शरद लाटे व एका अनोळखी इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मिनाक्षी सकट ह्या विद्यमान सरपंच आहेत . त्यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरणात आहे.

Comments
Add Comment

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मुंबईसह कोकण,

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १००

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणार: मंत्री नितेश राणे

चंदगड: सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे