Saturday, August 16, 2025

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू
मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट लागले आहे. मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना एकाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दहीहंडीसाठी रश्शी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) असे मृताचे नाव आहे. दहीहंडी दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले.

मुंबई शहर भागात १८ गोविंदा जखमी झाले. यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांना उपचार करुन घरी पाठवले आहेत. मुंबई पूर्व उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी ३ जणांवर उपचार सुरू आहेत तर तीन जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई पश्चिम उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी एकावर उपचार सुरू आहेत आणि पाच जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी दरम्यान मुंबईत एकाचा मृत्यू झाला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर १४ जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे.

ठाणे जिल्ह्यात आदित्य रघुनाथ वर्मा या गोविंदाला डोक्याला दुखापत झाल्यामुळे तर कृष्णा मिठू स्वयन याला उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे. समर बन्सीलाल राजभर यालाही डोक्याला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >