नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन


चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी ते पडले होते, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्यांचे निधन झाले.


ला. गणेशन यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी नागालँडचे २१ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पदभार स्वीकारला होता. यापूर्वी त्यांनी मणिपूर आणि पश्चिम बंगालचेही राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. ते भाजपचे एक ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.


Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा