जम्मू-काश्मीर : किश्तवाड ढगफुटीतील मृतांचा आकडा 65 वर

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. त्यात दोन सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे तर सुमारे १०० जखमी झाले आहेत. एनडीआरएफ तसेच राज्याच्या आपत्ती निवारण पथकांकडून बचावकार्य सुरूच आहे.

 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. ही ढगफुटीची घटना चसौती गावाजवळ घडली.

या गावाजवळ भाविक मोठ्या संख्येने मचैल माता यात्रेला जाण्यासाठी जमले होते. तिथून मंदिरापर्यंत ८.५ किमी पायी चालत जावे लागते. चसौती हे गाव ९,५०० फूट उंचीवर आहे. ते किश्तवाडपासून सुमारे ९० किमी अंतरावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६७ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यातील ३८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अचानक आलेल्या पुरामुळे यात्रेसाठी उभारण्यात आलेली सामुदायिक स्वयंपाकाची व्यवस्था (लंगर) आणि एका सुरक्षा चौकीचे नुकसान झाले आहे. २१ मृतदेहांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

 
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,