पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी


इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील आनंद दुखात परावर्तित झाला. सोहळा साजरा होत असताना झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक ८ वर्षाची मुलगी आणि एका वरिष्ठ नागरिकाचा समावेश आहे.


स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, अजीजाबादमध्ये एक छोटी मुलगी गल्लीमध्ये फिरत असताना तिला गोळी लागली तर कोरंगीमध्ये एक व्यक्ती स्टीफनचा मृत्यू झाला.


स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार कराचीच्या अनेक भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. यात लियाकताबाद, कोरंगी, महमूदाबाद, अख्तर कॉली, केमारी, जॅक्सन, बाल्डिया, ओरंगी टाऊन आणि पापोश नगर सारखे मुख्य भाग आहे. तर शरीफाबाद, नॉर्थ नाजिमाबाद, सुरजानी टाऊन, जमान टाऊन आणि लांधीसारख्या भागातही घटना घडल्या.


या गोळीबारात जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्परता दाखवत विविध भागांतून २०हून अधिक संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आधुनिक हत्यारे आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.



Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात