राजस्थान: खाटूश्यामजी मंदिरातून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात, १० ठार


जयपूर: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खाटूश्यामजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ मुले आणि ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत.


मनोहरपूर राष्ट्रीय महामार्गावर सैंथल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापी गावाजवळ हा अपघात घडला. भाविक एका पिकअप गाडीतून प्रवास करत होते. याच वेळी त्यांची गाडी एका कंटेनरला धडकली. या धडकेत पिकअप गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.


घटनेची माहिती मिळताच सैंथल पोलिसांचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटाह येथील रहिवासी होते आणि ते खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त