राजस्थानमध्ये भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये ७ मुले आणि ४ महिलांसह ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात उपाचारासाठी पाटवण्यात आले आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते आणि खातू श्याम दर्शनासाठी गेले होते.


पिकअप वाहन आणि ट्रेलरच्या धडकेमुळे झालेल्या या अपघातात अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि दौसा प्रशासनाने जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयात दाखल केले आहे. दौसा एसपींनी सांगितले की, हा अपघात पहाटे ३:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला. सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते.


जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार म्हणाले की, हे प्रवासी खातू श्यामजी यांना भेटून उत्तर प्रदेशकडे जात होते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर ८ जणांना जयपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेल्या पिकअप वाहन आणि ट्रेलर यांच्यातील धडकेमुळे हा भीषण अपघात घडला आहे.


मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यातून एक्सवरुन माहिती दिली की, दौसा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींवर त्वरित आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देव मृत आत्म्यांना आपल्या कमळ चरणी स्थान देवो आणि जखमींच्या प्रकृतीती लवकर सुधारणा होवो.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन