मुंबईत रंगणार पारंपरिक देशी खेळांचा थरार! लेझिम फुगडी ते लगोरी, विटी दांडूसह पावनखिंड दौड खेळांनी मैदान दणाणणार

  43

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन


मुंबई: कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात होणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पण ही याच सोहळ्यात केले जाणार आहे.


राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा महाकुंभचे उदघाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण होणार आहे. तर व्हिडीओ संदेशाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडा महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करणार आहेत.



१३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार


महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली असून येत्या १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान आपला देश विसरू शकत नाही. अहिल्यादेवींनी दिलेला सांस्कृतिक वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी मातीतले आपले पारंपरिक खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.


आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. नव्या पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब या सारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवावा, असे आवाहनही मंत्री श्री लोढा यांनी जनतेला उद्देशून केले आहे.


क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा,आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता आता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Comments
Add Comment

पाकिस्तानचा २०२ धावांनी दणदणीत पराभव करत विंडीजने २-१ ने जिंकली वनडे मालिका

त्रिनिदाद :  वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माचा माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव

मुंबई : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव

भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाला ईडीचे समन्स

नवी दिल्ली: माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 1xBet या

भारतीय क्रिकेटर आकाशदीपवर RTOची कारवाई, बिना नंबर प्लेटची फॉर्च्युनर कार चालवणे पडले महागात

लखनऊ: भारतीय क्रिकेटपटू आकाशदीप सिंहला नुकतीच घेतलेली टोयोटा फॉर्च्युनर कार अडचणीत आण

Asia Cup 2025: हार्दिक पांड्या फिटनेस टेस्ट देणार, श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित

नवी दिल्ली: आगामी एशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर सर्वांचे

IND vs ENG: करुण नायरने केले शुभमन गिलच्या नेतृत्वाचे कौतुक

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेत धीराने नेतृत्व केल्याबद्दल भारतीय फलंदाज करुण नायरने