Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण सेवा बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या उर्वरित उड्डाणे कोणत्याही समस्येशिवाय आणि वेळेवर सुरू राहतील.

प्रवाशांना परतफेड किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळेल


एअरलाइनच्या मते, ही उड्डाण सेवा स्थगित करण्याचे मुख्य कारण म्हणजे विमानांच्या ताफ्यात घट. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे मोठ्या प्रमाणात रेट्रोफिट (आधुनिकीकरण) कार्यक्रम सुरू केले आहे. जे २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, एकाच वेळी अनेक विमाने सेवेबाहेर राहणार असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई हद्दीचे मार्ग सतत बंद राहत असल्याने लांब पल्ल्याच्या विमानांच्या मार्गात आणखीन वाढ होते, ज्यामुळे काम अधिक गुंतागुंतीचे होते.

कंपनीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीसाठी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिले जातील. ज्यामध्ये इतर फ्लाइट्सचे पुन्हा बुकिंग करणे किंवा पूर्ण परतफेड करता येऊ शकते.

वॉशिंग्टनला वन स्टॉप फ्लाइटने पोहोचण्यासाठी पर्याय


प्रवाशांना अजूनही एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदार - अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स - द्वारे न्यू यॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथूनवन-स्टॉप फ्लाइट घेऊन वॉशिंग्टन डीसीला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचे सामान थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.
Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,