Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण सेवा बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या उर्वरित उड्डाणे कोणत्याही समस्येशिवाय आणि वेळेवर सुरू राहतील.

प्रवाशांना परतफेड किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळेल


एअरलाइनच्या मते, ही उड्डाण सेवा स्थगित करण्याचे मुख्य कारण म्हणजे विमानांच्या ताफ्यात घट. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे मोठ्या प्रमाणात रेट्रोफिट (आधुनिकीकरण) कार्यक्रम सुरू केले आहे. जे २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, एकाच वेळी अनेक विमाने सेवेबाहेर राहणार असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई हद्दीचे मार्ग सतत बंद राहत असल्याने लांब पल्ल्याच्या विमानांच्या मार्गात आणखीन वाढ होते, ज्यामुळे काम अधिक गुंतागुंतीचे होते.

कंपनीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीसाठी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिले जातील. ज्यामध्ये इतर फ्लाइट्सचे पुन्हा बुकिंग करणे किंवा पूर्ण परतफेड करता येऊ शकते.

वॉशिंग्टनला वन स्टॉप फ्लाइटने पोहोचण्यासाठी पर्याय


प्रवाशांना अजूनही एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदार - अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स - द्वारे न्यू यॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथूनवन-स्टॉप फ्लाइट घेऊन वॉशिंग्टन डीसीला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचे सामान थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.
Comments
Add Comment

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी