Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण सेवा बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या उर्वरित उड्डाणे कोणत्याही समस्येशिवाय आणि वेळेवर सुरू राहतील.

प्रवाशांना परतफेड किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळेल


एअरलाइनच्या मते, ही उड्डाण सेवा स्थगित करण्याचे मुख्य कारण म्हणजे विमानांच्या ताफ्यात घट. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे मोठ्या प्रमाणात रेट्रोफिट (आधुनिकीकरण) कार्यक्रम सुरू केले आहे. जे २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, एकाच वेळी अनेक विमाने सेवेबाहेर राहणार असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई हद्दीचे मार्ग सतत बंद राहत असल्याने लांब पल्ल्याच्या विमानांच्या मार्गात आणखीन वाढ होते, ज्यामुळे काम अधिक गुंतागुंतीचे होते.

कंपनीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीसाठी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिले जातील. ज्यामध्ये इतर फ्लाइट्सचे पुन्हा बुकिंग करणे किंवा पूर्ण परतफेड करता येऊ शकते.

वॉशिंग्टनला वन स्टॉप फ्लाइटने पोहोचण्यासाठी पर्याय


प्रवाशांना अजूनही एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदार - अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स - द्वारे न्यू यॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथूनवन-स्टॉप फ्लाइट घेऊन वॉशिंग्टन डीसीला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचे सामान थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.
Comments
Add Comment

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार