Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण सेवा बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या उर्वरित उड्डाणे कोणत्याही समस्येशिवाय आणि वेळेवर सुरू राहतील.

प्रवाशांना परतफेड किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळेल


एअरलाइनच्या मते, ही उड्डाण सेवा स्थगित करण्याचे मुख्य कारण म्हणजे विमानांच्या ताफ्यात घट. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे मोठ्या प्रमाणात रेट्रोफिट (आधुनिकीकरण) कार्यक्रम सुरू केले आहे. जे २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, एकाच वेळी अनेक विमाने सेवेबाहेर राहणार असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई हद्दीचे मार्ग सतत बंद राहत असल्याने लांब पल्ल्याच्या विमानांच्या मार्गात आणखीन वाढ होते, ज्यामुळे काम अधिक गुंतागुंतीचे होते.

कंपनीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीसाठी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिले जातील. ज्यामध्ये इतर फ्लाइट्सचे पुन्हा बुकिंग करणे किंवा पूर्ण परतफेड करता येऊ शकते.

वॉशिंग्टनला वन स्टॉप फ्लाइटने पोहोचण्यासाठी पर्याय


प्रवाशांना अजूनही एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदार - अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स - द्वारे न्यू यॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथूनवन-स्टॉप फ्लाइट घेऊन वॉशिंग्टन डीसीला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचे सामान थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.
Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच