भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्यूचा सापळा

४ वर्षांत १ हजार २०३ भारतीय मृत्युमुखी


टोरँटो  : कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. सरकारने संसदेत सांगितल्याप्रमाणे, गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये १००० हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धापकाळ किंवा आजारपणासारख्या नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सरकारने कॅनडाहून ७५७ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल विचारण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना कीर्ती वर्धन सिंह यांनी संसदेत सांगितले की, "मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२४ दरम्यान कॅनडामध्ये एकूण १ हजार २०३ भारतीयांचा मृत्यू झाला.

यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धत्व आणि गंभीर आजारामुळे झाले. शिवाय, अपघात, हिंसाचार, हत्या आणि आत्महत्या यांसारख्या अनैसर्गिक कारणांमुळे अनेक मृत्यू झाल्याची माहिती आहे."भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे एक विशिष्ट मानक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सर्व भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या समस्यांसाठी एकत्र काम करतात, अशी माहिती कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.

या प्रक्रियेत मृत्यू, स्थानिक पातळीवर अंत्यसंस्कार किंवा दफनविधीची व्यवस्था करणे, मृतदेह भारतात त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवणे यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे.

भारतावर हल्ल्यासाठी बांगलादेशमध्ये नवीन दहशतवादी तळाची उभारणी

‘मोस्ट वाँटेड’ हाफिज सईदचा कुटिल डाव नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व जमात-उद-दावा दहशतवादी संघटनाचा

दिल्ली स्फोटात १३ जणांचा मृत्यू

४० हून अधिक जखमी, एका संशयितास अटक,  शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक,  दिल्लीसह देशातील प्रमुख