तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी जयश्री आणि वय वर्षे ५ व ७ असलेल्या दोन मुलींची निर्घृण हत्या केली असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे की, त्यादिवशीही काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला असावा. त्यानंतर संतापाच्या भरात प्रदीपने हे अमानुष कृत्य केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील तपास वेगाने करण्यात येणार आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

Comments
Add Comment

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण