गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी २८ ऑगस्ट, पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी १ सप्टेंबर, गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचवा दिवस हा १ सप्टेंबर नसून तो ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्याची बाब गणेशोत्सव समितीने लक्षात आणून दिली आहे.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु यामध्ये तारखांचा गोंधळ असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी समन्वय समितीने शहर व उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.


ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

Comments
Add Comment

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Rain Update : राज्यात २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, मुंबईत मोठ्या संख्येने भाविकांनी शहरातील प्रमुख मंदिरांना भेट दिली,