सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचा मुंबईतला सेट तोडला, शूटिंग रद्द

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात मुख्य कलाकराच्या भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निवडक साहसी दृश्यांचे शूटिंग अर्थात चित्रिकरण मुंबईत करण्याचे नियोजन होते. या शूटिंगसाठी मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्याचा सेट उभारला होता. हा सेट तोडण्यात आला आहे. सलमानच्या चित्रपटाचे मुंबईतले शूटिंग रद्द झाले आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षाचा संदर्भ असलेला भारतीय कर्नलची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बॅटल ऑफ गलवान'. या चित्रपटाचे ऑगस्ट महिन्यात मुंबईत शूटिंग करायचे नियोजन होते. आता हे शूटिंग रद्द झाले आहे.

चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्येच सुरू होणार आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांचे शूटिंग २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात होणार आहे. मुंबईतील सेटवरचे शूट आणि लडाखमधील शूट यात किमान ३० दिवसांचे अंतर राहणार होते. यामुळे चित्रपट सातत्य अर्थात सिनेमा कंटिन्यूटीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका होता. यामुळेच मुंबईतले ठरलेले सेटवरचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.

'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात सलमान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची भूमिका साकारत आहे. चित्रांगदा सिंग पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे. जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे कलाकार पण या चित्रपटात दिसतील.

विषय संवेदनशील असल्यामुळे आवश्यक ती परवानगी घेतल्यानंतरच चित्रपटाच्या शूटिंगचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

संजू राठोडने सुंदरी गाण्याच्या निमित्ताने या गाण्याची कॉपी मारली ? इन्स्टा युझरने केला आरोप

मुंबई : गायक संजू राठोड सध्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर आहे. प्रत्येक गाणे रिलीज होताच

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत, ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट

कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण

अक्षया नाईकचं ओटीटीवर पदार्पण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया