जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

  24

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सुमिंद्राबाई जाधव (वय ७०) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय ४८) मागील काही दिवसांपासून करत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने काकासाहेब रागात होता. आई शेतावर एकटीच गेली असल्याचे समजताच तो शेतावर गेला आणि तिथे आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला.



गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकण्यात आला. सुमिंद्राबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चौकशीत आई-मुलामध्ये जमिनीच्या विक्रीवरून वाद असल्याचे उघड झाले.


यामुळे पोलिसांनी काकासाहेबाचा शोध सुरू केला, मात्र तो सापडले नव्हता. अखेर रेणापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे.

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा

'पत्नीच्या कपड्यांवर किंवा स्वयंपाकावर टीका करणे ही क्रूरता नाही', मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

पत्नीची फिर्याद फेटाळली, पतीची निर्दोष मुक्तता औरंगाबाद:  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका